Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती | Full information about Gram Panchayat

    Views
    ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती | Full information about Gram Panchayat

    ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

    कायदा – 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)

    कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
    परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
    सभासद व त्यांची विभागणीकमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17
    लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :
    लोकसंख्या :
    1. 600 ते 1500 – 7 सभासद
    2. 1501 ते 3000 – 9 सभासद
    3. 3001 ते 4500 – 11 सभासद
    4. 4501 ते 6000 – 13 सभासद
    5. 6001 ते 7500 – 15 सभासद
    6. 7501 त्यापेक्षा जास्त – 17 सभासद
    निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
    कार्यकाल 5 वर्ष
    विसर्जन – कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.
    आरक्षण :
    1. महिलांना – 50%
    2. अनुसूचीत जाती/जमाती – लोकसंख्येच्या प्रमाणात
    3. इतर मागासवर्ग – 27% (महिला 50%)
    ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :
    1. तो भारताचा नागरिक असावा.
    2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
    3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.
    ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.
    सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.
    सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.
    राजीनामा :
    सरपंच – पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
    उपसरपंच – सरपंचाकडे
    निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :
    सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.
    अविश्वासाचा ठराव :
    सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
    बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)
    अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच
    तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.
    अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.
    आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.
    ग्रामसेवक / सचिव :
    निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
    नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी
    नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी
    कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा
    कामे :
    1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
    2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
    3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
    4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
    5. व्हिलेज फंड सांभाळणे.
    6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
    7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
    8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
    9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.
    ग्रामपंचातीची कामे व विषय :
    1. कृषी
    2. समाज कल्याण
    3. जलसिंचन
    4. ग्राम संरक्षण
    5. इमारत व दळणवळण
    6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
    7. सामान्य प्रशासन
    ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.
    बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)
    सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.
    अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच
    ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

    No comments:

    Post a Comment