Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, August 9, 2017

    चालू घडामोडी-९ऑगस्ट

    Views
    जागतिक स्तरावरही ‘पुणे सुपरफास्ट
    Maharashtra Times |
    पुणे : लंडन, लॉस एंजेलिस, बोस्टन आणि दुबईपेक्षा पुणेकरांना दर वर्षी दरडोई अधिक वीज मिळते, लंडन व लॉस एंजेलिसच्या तुलनेत पुण्यात झाडांची संख्या अधिक आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे पुण्यातून या शहरांपेक्षा अधिक पेटंट्स दाखल होतात, तर या शहरांच्या तुलनेत १५ ते २४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाणही पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्याला वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटाचे ‘प्लॅटिनम सर्टिफिकेट’ मिळाले आहे.
    टाटा ट्रस्टने ‘वर्ल्ड कौन्सिल ऑन सिटी डेटा’च्या सहकार्याने ‘सिटी डेटा फॉर इंडिया’ ही पाहणी केली. ‘आयएसओ ३७१२०’नुसार १७ संकल्पनांवर आधारित विविध १०० मुद्द्यांनुसार ही पाहणी करण्यात आली. भारतातील फक्त पुणे, सुरत आणि जमशेदपूर ही शहरेच हे सर्टिफिकेट मिळविण्यास पात्र ठरली. या पाहणीतील तुलनेसाठी निकषांची निवड करण्याचे स्वातंत्र्य संबंधित शहरांना होते, अशी माहिती टाटा ट्रस्टचे पार्टनरशीप अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रभात पाणी यांनी ‘मटा’ ला दिली. ऊर्जेच्या वापराबाबत या पाहणीतील ४१ शहरांमध्ये पुण्याचा ४१ वा क्रमांक लागतो. पुण्यात दर वर्षी दरडोई ७२९.९५ किलोवॉट विजेचा वापर होतो. हा आकडा दुबई, लॉस एंजेलिस, बोस्टन, ब्रिस्बन आणि लंडनपेक्षा अधिक आहे.
    तरुणांची संख्या अधिक
    या पाहणीनुसार पेटंट्स दाखल करण्यातही पुणे आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी १०.७७ पेटंट्स दाखल होतात, तर ब्यूनॉस आयर्समध्ये हे प्रमाण ८.९ आणि लंडनमध्ये अवघे ३.४ इतके आहे.
    लोकसंख्येच्या दृष्टीनेही पुण्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातील १८.५१ टक्के लोकसंख्या ही १५ ते २४ या वयोगटातील आहे. लंडनमध्ये हेच प्रमाण १२.१९ टक्के, दुबईत ११.२३ टक्के आणि अॅमस्टरडॅममध्ये १३ टक्के इतके आहे. त्यावरून पुण्याला कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीत योग्य लक्ष देऊन आर्थिक उन्नती साधण्याची संधी असल्याचे स्पष्ट होते.
    क्रूझ टर्मिनससाठी मुंबईहोमपोर्ट
    मुंबईकडे लाखोंची कूच
    शेतातील घर पेटविले
    • भारतातील क्रूझ टर्मिनससाठी गृहबंदर (होमपोर्ट) म्हणून मुंबई निवड झाली असून, क्रू्झ केंद्र म्हणून महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी धोरण ठरवण्याच्या दृष्टीने जलवाहतूक मंत्रालयाशी परस्पर सहकार्य करार केला जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘द डॉन ऑफ क्रूझ टुरिझम इन इंडिया’च्या या उपक्रमाचे मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल हेही उपस्थित होते. क्रूझ पर्यटन हे ‘गेम चेंजर’ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    जगभरात क्रूझ पर्यटनाचा वेगाने प्रसार होत आहे. या माध्यमातून आर्थिक विकासही होत आहे. भारतातील क्रूझ पर्यटनासाठी मुंबईची होमपोर्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या माध्यमातून परकीय चलन मिळेल तसेच रोजगाराचीही संधी इथे उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा क्रूझ केंद्र म्हणून विकास करण्यात येणार आहे. भारताला लाभलेल्या किनारपट्टीमुळे क्रूझ पर्यटन विकसित होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. क्रूझ पर्यटनाबद्दल निर्माण होणारे आकर्षण लक्षात घेऊन इटली येथील ‘कोस्टा क्रूझ’ने मुंबई ते मालदीव या मार्गावर ‘कोस्टा निओक्लासिका’ ही क्रूझ सेवा करण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबर सन २०१७मध्ये या प्रवासाला सुरुवात होईल. १७०० प्रवासी आणि ८५८ केबिनचा त्यात समावेश असेल. आतापर्यंत क्रूझ पर्यटन वाढतच गेले आहे आणि आर्थिक वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक झाले आहे, याकडे या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आले.
    पाऊस पुन्हा सक्रिय होणार
    पुढील आठवड्यात बरसण्याची शक्यता
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
    महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशात सध्या जोरदार पावसाची नोंद होत आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. परंतु ११ ते १७ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात पुन्हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
    देशात महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, हरयाणा, चंडीगड, राजस्थान, प. बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये तीव्र अतितीव्र स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे.
    मुंबईत सरासरीपेक्षा कमी
    मुंबईतून पाऊस सध्या गायब झाला आहे. सांताक्रूझमध्ये सरासरीपेक्षा ८० मिमी तर कुलाबा येथे सरासरीपेक्षा ३०० मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई व परिसरात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्याच पावसाची नोंद होत आहे.
    कोकणात मध्यम पाऊस
    कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पसरलेल्या पावसाची नोंद होत आहे. या भागात पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. तेथे मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या नाहीत.
    मध्य महाराष्ट्रात सर्वदूर
    मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सर्वदूर पसरलेला पाऊस आहे. मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आहेत. मात्र नाशिक, मालेगाव, गगनबावडा, कोल्हापूर, महाबळेश्वरमध्ये कमी-अधिक प्रमाणात मुसळधार पावसाच्या नोंदी होत आहेत.
    विदर्भात शक्यता
    विदर्भातही मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी होत आहेत. परंतु हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे.
    राज्यात बसरणार
    सध्या मध्य प्रदेशात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण बंगालच्या खाडीत तयार झाले आहे. अजूनही महाराष्ट्रातील पावसाच्या दृष्टीने बंगालच्या खाडीत अनकुल वातावरण तयार झालेले नाही. चांगल्या पावसासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे गरजेचे असते. सध्या तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे खास करून किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर कमी आहे. मात्र येत्या ११ ते १७ ऑगस्टच्या काळात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन राज्यात पुन्हा पाऊस दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे.

    वेगवेगळ्या उद्योगांतील गुंतवणुकीला प्रोत्साहनावर भर, सरकारतर्फे व्यवसायपूरक धोरण
    मुंबई - भारताला "पॉवर हाउस' बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांची मदत घेण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. "मेक इन इंडिया'द्वारे परदेशस्थ भारतीयांनी देशात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत. अनिवासी भारतीय हे देशाचे मोठे भांडवल असून, त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी विशेष योजना तयार केल्या जात आहेत.
    परदेशात मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना (एनआरआय) देशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारने अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांसाठी थेट परकी गुंतवणुकीचे (एफडीआय) नियम शिथिल केले आहेत. देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठी अनिवासी भारतीय (एनआरआय), परदेशस्थ भारतीय (ओआयसी) भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पीआयओ) यांच्यासाठी परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांत दुरुस्ती केली आहे.
    केंद्र सरकारच्या या बदलांमुळे "मेक इन इंडिया' आणि "मेक इन महाराष्ट्र'द्वारे संरक्षण, रेल्वे, विमा, वैद्यकीय उपकरणे, मसाले या क्षेत्रात गुंतवणुकीस परदेशस्थ भारतीय उत्सुक दिसत आहेत.
    टाटांसारख्या उद्योग समूहाने अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टिनचे एफ-16 लढाऊ विमान भारतात बनविण्यासाठी "मेक इन इंडिया'बाबतचा करार केला आहे. डॉ. धनंजय दातार यांनी मसाले आणि पीठ तयार करून पॅकबंद करण्यासाठी मसाला किंग एक्‍स्पोटर्स नावाने मुंबई, भारतासह देशविदेशात व्यवसाय वाढवला आहे.
    याशिवाय, नव्या पेन्शन्स स्कीम्स लागू करण्यात आल्या आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 10 ऑक्‍टोबर 2003 रोजी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली. पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीमार्फत 1 जानेवारी 2004 पासून सरकारी नोकरीत दाखल होणाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळत नाही. त्यांच्यासाठी या योजनेत गुंतवणूक सुरू केली आहे. ही योजना सर्वांसाठी मे 2009 पासून सुरू आहे. अठरापासून 60 वयांपर्यंत कोणीही सक्षम व्यक्ती भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक या योजनेचे खाते उघडू शकते.
    परदेशात राहणाऱ्या भारतीयांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढतच आहे. रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या तपशिलानुसार, परदेशस्थ भारतीयांची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 5,663 कोटी होती, ती आता सुमारे 8766 कोटी झाली आहे. भारतातील रूपी खात्याद्वारे केलेली गुंतवणूक परकी गुंतवणूक म्हणून मानण्यात येणार नाही. यामुळे देशातील परकी गुंतवणूक आणि परकी गंगाजळीचा ओघ वाढणार आहे.
    देशातून बाहेर जाणारा "एनआरआय' निधीही देशांतर्गत गुंतवणूक मानण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या अनेक अनिवासी भारतीय करदाते देशात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे यांसारख्या शहरांतील रिअल इस्टेट क्षेत्रात बारमाही तेजी असते. त्यामुळे अशा शहरात अनिवासी भारतीय फ्लॅट घेतात. अनिवासी भारतीयाला भारतात शेतजमीन, फार्म हाउस, बागायती जमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे या नागरिकांसाठी कायद्यात काही दुरुस्ती करता येतील का, यावरही विचाराची गरज आहे.